इतरांनी कळत नकळत; आपला कितीही पाणउतारा केला, निंदा केली, अटी घातल्या, अडचणी दाखविल्या, ज्ञान व कर्मकांडाचा बाऊ केला; तरी आपण विचलित होता कामा नये. नाउमेद होता कामा नये. आपण कसेही असलो, कितीही पतित असलो तरी सद्गुरुकृपेने नामस्मरणाच्या नौकेतूनच पैलतीराला नक्की पोचू! श्रीराम समर्थ!